राजगुरूनगर – भीमाशंकर-भोरगिरी परिसरासह संपूर्ण खेड तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत असल्याने धरणे तिनही धरणे ओव्हर फ्लो झाल्याने विसर्ग सुरू आहे. त्यातच राजगुरूनगर येथील केदारेश्वर बंधाऱ्याचे ढापे काढण्यास प्रशासनाने दिरंगाई केल्याने बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने केदारेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.
खेड तालुक्यात सलग 10 ते 15 दिवस मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे भीमा नदीला मोठा पूर आहे. तर चासकमान धरणातून रविवारी (दि. 4) दुपारी 52 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडल्याने राजगुरूनगर शहरातील केदारेश्वर बंधारा तेव्हापासून पाण्याखाली आहे. त्यातच बंधाऱ्याचे ढापे काढण्यास दिरंगाई झाल्याने पुराचे पाणी बंधाऱ्यावरून गेले आहे. अजूनही ते सुरूच आहे. ढापे न काढल्याने पाण्याचा प्रवाह राजगुरुनगरच्या बाजूने आल्याने येथील बंधाऱ्याच्या भराव पाण्यात वाहून गेला असून या रस्ता बंद झाला आहे. या रत्यावरून राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे जावे लागते तर नगरपरिषदेचे वाहने जा-येण्यासाठी याच रस्त्याचा वापर करीत असता मात्र, रस्ताच वाहून गेल्याने अनेक अडचणी येत आहे.