मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि सत्ताधारी यांच्यात रोज काही ना काही मुद्यावरून खडाजंगी सुरु असते. त्यातच आता किरीट सोमय्या यांनी राज्यात सुरु असणाऱ्या भोंग्यांच्या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांचा भगवा आता हिरवा झाला आहे म्हणून त्यांना मशिदींवरील भोंग्यांची काळजी असल्याचा घणाघात सोमय्या यांनी केला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी,”ध्वनी प्रदूषणाच्या नावावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी मेट्रो करशेडची वाट लावली. मग आता ज्या धर्माच्या नावावर सकाळी 4 वाजता पासून एवढ्या डेसिबलचे भोंगे चालू का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे अडचणीत आले आहेत. भगवे उतरवून हिरवे झाले आहे. म्हणून त्यांना मशिदीच्या भोंग्यांची काळजी आहे,” असा टोला यावेळी सोमय्या यांनी लगावला.
सोमय्या यांनी म्हटले कि, ज्यावेळी योग्य परिस्थिती होत असते. पंतप्रधान मोदी यांनी ती स्थिती निर्माण केली. म्हणून 370 गेले, बाबरी मशिदीच्या जाग्यावर राम मंदिर निर्माण झालं. योगी सरकारने नियम केले, पहाटेची अजान बंद होणार. अजान करा पण लाऊडस्पीकरची गरज काय? असे झाल्यास देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची काही गरज नाही. उद्धव ठाकरेंनी हिरवे हातात घेतल्याने ही शरणागती पत्करली असल्याचेही सोमय्या म्हणाले.
गणेश विसर्जन मिरवणूक दहानंतर लाऊड स्पीकर बंद होतो. ज्या धार्मिक स्थळांवर अधिकृत भोंगे आहेत, त्यांचे डेसिबल कंट्रोल करा, जे अनधिकृत आहे ते काढा. हिंदू सणांवर का हे नियम आहेत? नियम मला मान्य आहेत, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे, शिवसेनेची आता टरकली आहे. अनधिकृत भोंगे कुठे आहेत, तिथे त्यांची जाण्याची हिम्मत नाही. तिथे गेले तर खुर्ची जाणार, तिथे गेले तर वसुली बंद होणार, अशी टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले की, मला राजकीय पक्षांवर बोलायचे नाही. हनुमान चालीसा बोलणाऱ्यांना देशद्रोही बोललं जातं. मग पहाटे वाजणाऱ्या भोंग्यांवर आयुक्त संजय पांडे कारवाई का करत नाहीत, असा सवाल देखील यावेळी त्यांनी केला.