जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या वारंवार अपील करण्यावरून मैदानावरील पंच मॉरीस इरास्मस यांनी संताप व्यक्त केला आहे.
तुम्ही सगळे अशी सातत्याने अपील करून माझ्यावर इतके दडपण टाकत आहात की मला ह्रदयविकाराचा झटका येइल, अशा शब्दांत पंचांनी आपला संताप व्यक्त केला. त्यांनी गोलंदाजांशी केलेला हा संवाद यष्टीत बसवण्यात आलेल्या माइकमुळे समोर आला.
जसप्रीत बुमराह आणि मार्को जेन्सन यांच्यात भर मैदानावर झालेला वाद व त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सातत्याने केलेली अपील पंचांसाठी डोकेदुखी ठरली होती.
जास्त अपील करण्याबद्दलही आयसीसीकडून कारवाई केली जाते मात्र, इरास्मस यांनी केवळ गोलंदाजांना समज दिली व हे प्रकरण अखेर शांत झाले.