नवी दिल्ली – रोहित शर्मानंतर भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो, असा विश्वास भारताचा माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्रा याने व्यक्त केले आहे.
रोहित पुढील काळात कसोटी संघाचेच नेतृत्व आपल्याकडे राखेल असेच चित्र सध्या दिसत आहे. त्याचवेळी टी-२० व एकदिवसीय सामन्यांचे नेतत्व एकाच खेळाडूकडे राहीले तर संघासाठी ती योग्य बाब ठरेल. सूर्यकुमार यादव व लोकेश राहूल हे पर्याय असू शकतील परंतू नियमित कर्णधार बनण्याची त्यांची क्षमता कीतपत आहे ते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेत दिसेलच. मात्र, बीसीसीआयला जर लंबी रेस का घोडा हवा असेल तर त्यासाठी गिल हाच एकमेव सक्षम पर्याय आहे, असेही चोप्रा म्हणाला.
गिलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसेच आयपीएल स्पर्धेतही बदली कर्णधार म्हणून काम केले आहे व ते यशस्वीही करुन दाखवले आहे. त्यामुळे बीसीसीआय, निवड समितीनेही गिलबाबत दूरगामी विचार करणे इष्ट ठरेल, असेही चोप्रा म्हणाला.
U19 Asia Cup 2023 : कुलकर्णीची अष्टपैलू कामगिरी; टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर 7 विकेट्सने विजय…
गिलच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकली तर तो प्रभावी ठरला आहे. शुभमनने भारतासाठी 44 वनडे खेळले आहेत. यामध्ये त्याने 6 शतके आणि 13 अर्धशतके केली आहेत. शुभमनने 2 हजार 271 धावा केल्या आहेत. त्याने द्विशतकही झळकावले आहे. शुभमनची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या 208 धावा आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने आतापर्यंत 254 चौकार आणि 52 षटकार मारले आहेत.
शुभमनने अल्पावधीतच अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो 7व्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. शुभमनने 38 डावातच ही कामगिरी केली आहे.