T20 WC 2024, Team India Squad : येत्या 1 जूनपासून टी-20 क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये याचे आयोजन केले जाईल, भारतीय संघ 5 जूनपासून विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे, जिथे त्यांचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान 9 जूनला भिडणार आहेत. सर्व संघांना 1 मे पर्यंत आपापल्या संघांची घोषणा करायची आहे.
बीसीसीआय 27 किंवा 28 एप्रिल रोजी क्रिकेट T20 विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर करू शकते. रोहित शर्मा आयपीएल सामन्यासाठी दिल्लीत असेल, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर सुट्ट्यांवरून परतत आहे. यावेळी कर्णधार रोहितच्या उपस्थितीत बीसीसीआयची बैठक होणार असून, संघाची घोषणाही होण्याची शक्यता आहे. यापूर्वी माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने त्या तीन खेळाडूंची नावे सांगितली आहेत, जे टॉप 3 फलंदाज म्हणून भारतीय संघात असायला हवेत.
Now that World Cup is nearing. My top 3 for team India.
1) Rohit Sharma (in form as well as captain)
2) Yashasvi Jaiswal (been saying that he should be there even before his 100 purely cos he was performing well for team India before the ipl)
3) Virat Kohli. (Shouldn’t be…
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 23, 2024
1. विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाची सर्वोत्तम सलामी जोडी कोणती असेल यावर प्रत्येकजण आपापली मते मांडत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माने डावाची सलामी दिली पाहिजे, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले. इरफान पठाणचेही तसे मत नाही आहे. त्याच्या मते रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाची सुरुवात करावी, असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
2. Rohit Sharma & Yashasvi Jaiswal : रोहितबाबत त्याने लिहिले की, तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि कर्णधारही आहे. यशस्वीबद्दल त्याने लिहिले की, “मी म्हणत होतो की तो त्याच्या 100 च्या आधी तिथे असावा कारण तो आयपीएलपूर्वी टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत होता.”
Team India : ‘या’ 9 खेळाडूंचे T20 विश्वचषक संघातील स्थान निश्चित, IPLमध्ये करत आहेत चमकदार कामगिरी…
3. Virat Kohli : इरफान पठाणचे मत आहे की, तिसऱ्या क्रमांकासाठी विराट कोहलीपेक्षा चांगला कोणी नाही. त्याने लिहिले आहे की, “त्याच्या स्थानावर किंवा स्ट्राइक रेटबद्दल कोणताही प्रश्न नसावा. ख्रिस गेलच्या (51+) सरासरीपेक्षा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याचा स्ट्राइक रेट (138+) चांगला आहे. त्याचा आयपीएलच्या या हंगामात स्ट्राइक रेट 150 इतका आहे.