मुंबई – राज्यातील बंद मंदिरांबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. या पत्रात मंदिर कुलूपबंद का ? असा प्रश्न राज्यपालांनी उपस्थित केला आहे. राज्यपालांच्या या विचारण्याला अभिनेत्री कंगनाने पाठिंबा दर्शवत भाजप कार्यकर्त्यांसोबत मंदिरे खुली करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात उडी घतली आहे.
बार- रेस्टाॅरंट सुरू झाले, देवच कुलूपबंद का ?, असा प्रश्न राज्यपाल कोश्यारी
यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसंच हिंदुत्वाचा विसर पडला का ?, असंही राज्यपालांनी त्यांना विचारलं आहे. मदिरं सुरू करू नयेत असे काही दैवी संकेत मिळतात का? असं विचारत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यपालांच्या या पत्राच्या पार्श्वभूमीवर ट्विट करत कंगनाने पुन्हा एकदा ठाकरे सेनेचा बाबर सेना असा उल्लेख केला आहे.
कंगनाने ट्विट करत म्हटले आहे की, माननीय राज्यपाल साहेबांनी गुंडा सरकारला प्रश्न वीचारला आहे हे ऐकून छान वाटले, गुंडांनी बार आणि रेस्टाॅरंट उघडले पण रणनीतिच्या दृष्टीने मंदिरे मात्र बंदच ठेवली. सोनिया सेनेची वर्तणूक बाबर सेनेपेक्षाही वाईट आहे, असं कंगनाने म्हटलं आहे.