नागपूर: सोमवारपासून विधानसभेचे अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सावरकरांच्या मुद्यावरून आक्रमक होत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा मुद्दा घेतला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत कामकाज तहकूब करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. यावर चर्चा सुरु असताना भाजप आणि शिवसेनेच्या आमदाराच्या हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपाने केलेल्या मागणीवर चर्चा सुरु असताना शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यामध्ये हाणामारी झाली. यानंतर भाजपाचे आमदार आशिष शेलार, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला.
Nagpur: Leader of Opposition Devendra Fadnavis raised the issue of losses to farmers due to untimely rainfall, in the Maharashtra assembly, today. BJP MLAs raised slogans against the government. #Maharashtra pic.twitter.com/uGJxoH14kZ
— ANI (@ANI) December 17, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार घडल्यानंतर सभागृहाचे कामकाज 30 मिनिटं स्थगित करण्यात आले होते. यानंतर सभागृहात जे घडलं ते आजपर्यंतच्या इतिहासात अत्यंत चुकीचं घडलं. एकमेकांच्या अंगावर जाण्याचा कुणाला अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकावणं चुकीचं आहे, सत्ताधारी आणि विरोधकांना मी समज देतो असं सांगत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा सभागृहाचं कामकाज सुरु केलं आहे.