मुंबई : राज्याच्या राजकरणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. अजिप पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारच नाही तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत.
सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हे हे दोन्ही खासदार उपस्थित आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे अजित पवार नाराज असल्याने त्यांनी हे पाऊल उचललं आहे.
अजित पवार यांनी विरोधी पक्षनेताचा राजीनामा दिला त्यानंतर राजभवनावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, यावेळी एकूण 9 राष्ट्रवादीचे आमदार शपथ घेणारअसल्याचं सांगितले जात आहे. तर आता राष्ट्रवादीचे दोन खासदार देखील अजित पवारांसोबत गेल्याने त्यांना देखील केंद्रात काही जबाबदारी मिळते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.