Lok Sabha Election 2024 । देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात जोरदार लढत होत आहे. गेल्या सहा महिन्यांत बारामतीचे होम गाऊंड ढवळून निघाले आहे. सध्या ही लढाई अटीतटीवर येऊन ठेपली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी काकांशी फारकत घेऊन महायुतीचा रस्ता धरला. त्यानंतर बारामती लोकसभेतील समीकरणे बदलून गेली आहेत अशात अजित पवार शरद पवारांकडे परत येणार असल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. सुप्रिया सुळे यांनी नुकताच वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना अजित पवार शरद पवारांकडे परत आले तर काय? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नांचे उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी मी जर तरच्या गोष्टींचा विचार करत नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
नेमकं काय आहे म्हणाल्या सुप्रिया सुळे
‘अजित पवार परत आले तर काय? या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. मी जर तरच्या गोष्टींचा विचार करत नाही. मी वास्तवतेत जगणारी व्यक्ती आहे. अजित पवारांनी आता वेगळी वैचारिक भूमिका घेतली आहे. त्यामुळे एखाद्याने एखादी वैचारिक भूमिका घेतली असेल, त्यांना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी हाच प्रश्न शरद पवार यांनाही विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली होती. “भविष्यात अशी परिस्थिती उद्भवली, तर आधीच्या अनुभवावरून आलेला शहाणपणा स्वीकारायचा असतो”, अशा सूचक शब्दांत त्यांनी उत्तर दिले होते.
हे वाचले का सलग दुसऱ्या महिन्यात नागरिकांना दिलासा ; आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घट