Maharashtra Foundation Day Eknath Shinde| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 1 मे रोजी मुंबईत हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील हुतात्मा चौकात हजेरी लावली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास आहे. तीच संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली ठरेल, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.
याशिवाय सध्या महाराष्ट्रात राजकारणाची भाषा बिघडत चालल्याने याबाबतही त्यांनी भाष्य केले. “महाराष्ट्र एक संस्कृत राज्य असून पुरोगामी महाराष्ट्राला एक परंपरा आहे. निवडणुका येतात-जातात. पण राज्यकर्ते कोण काय करतं, हे मागे राहते. दुर्देवाने राजकारणाची पातळी खालावली आहे. रोज शिव्या, शाप आरोप या पलीकडे विरोधकांकडून काही ऐकायला आणि पाहायला मिळत नाही”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
# Live📡| 01-05-2024
📍हुतात्मा चौक, मुंबई
🎥 हुतात्मा स्मारक – महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण कार्यक्रम
https://t.co/o26eI3HeE9— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 1, 2024
पुढे ते म्हणाले, “हे सर्वसामान्यांच सरकार आहे, आरोपांकडे लक्ष देत नाही. विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात 10 वर्षात प्रगती झाली. महाराष्ट्रात डबल इंजिनच सरकार आहे. आम्ही आरोपांना उत्तर न देता, कामाने उत्तर देतो आहोत. जनता सूज्ञ आहे. जनता काम करणाऱ्यांच्या मागे उभी राहते.”
“घरी बसलेल्यांमुळे महाराष्ट्र मागं राहिला”
गिरणी कामगारांच्या घरांविषयी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं. “ही मुंबई कामगारांच्या कष्टानं उबी राहिली आहे. मुंबई ही कामगारांच्या कष्टाने, मेहनतीने उभी राहिली. सर्वात आधी आमच्या सरकारने गिरणी कामगारांना घर देण्याचा निर्णय घेतला. जवळपास 5 हजार गिरणी कामगारांना घर देण्यात आल्याचे समाधान आहे. जेवढे गिरणी कामगार पात्र आहेत, त्या सर्वांना जिथे शक्य आहे, तिथे घर देणार ही एक मोठी अचिवमेंट ठरेल.” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच घरी बसलेल्यांमुळे महाराष्ट्र मागं राहिला आहे. सोशल मिडियावरून राज्य चालवता येत नाही, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
हेही वाचा:
“धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस, मी जर बोललो तर..” ; शरद पवारांचा हल्लाबोल