पुणे : करोनाचा फटका न्यायालयाच्या कामकाजाला बसला आहे. शिवाजीनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे कामकाज उद्यापासून सकाळी 11 ते दुपारी दोन या वेळेत सुरू राहणार आहे.
यामध्ये केवळ जामीन ,अटकपूर्व जामीन, रिमांड आणि दिवानीमध्ये मनाई आणि इतर महत्वाच्या आदेशाबाबत सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने न्यायालयाचे केवळ तीन तास कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन .पी. धोटे यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. न्यायालयातील कॅन्टीनही याच वेळेतच सुरू राहणार आहेत, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सतीश मुळे यांनी दिली.
ते म्हणाले या आदेशानुसार पक्षकाराने न्यायालय न्यायालयाने बोलवले तरच हजर राहायचे आहे. विनाकारण हजर राहू नये.
केवळ अत्यावशक प्रकरणात सुनावणी होणार आहे. इतर प्रकरणांमध्ये पुढील तारखा देण्यात येणार आहेत. तसेच वकिलांनीही गरज नसताना पक्षकारांना न्यायालयात बोलू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.