Sanjay Raut – गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यावेळच्या भाजपबरोबरच्या युतीत लोकसभेच्या २३ जागा लढवल्या होत्या. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीत २३ जागांचा आग्रह धरला आहे.
आजही शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष असल्याने आमचा या जागांविषयीचा आग्रह कायम आहे या बाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे अशी माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि के सी वेणुगोपाल यांच्यासह अन्य काँग्रेसचे नेत्यांबरोेबर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे गर्चा करीत आहेत.
आम्ही नेहमीच म्हणत आलो की दादरा आणि नगर हवेलीसह लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेहमीच 23 जागांवर लढत आली आहे आणि त्या बाबत आम्ही ठाम आहोत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस बरोबर चर्चा करून जागा वाटप निश्चीत केले जाईल असे त्यांनी नमूद केले. आम्ही ठरविले की आम्ही जिंकलेल्या जागांवर नंतर चर्चा केली जाईल.
काँग्रेसला महाराष्ट्रात एकही जागा जिंकता आली नाही, त्यामुळे त्यांना शून्य (जागा) पासून सुरुवात करावी लागेल, परंतु काँग्रेस हा एक महत्त्वाचा सहयोगी आहे. आम्ही महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्र काम करू,असे ते म्हणाले.
आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.
शिवसेना आणि शरद पवार यांना जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे.
जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत कोणताही संघर्ष नाही. जागावाटपाबाबत आम्ही केवळ दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करू, महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांशी नाही, असेही ते म्हणाले.