नगर – मागील पंधरा दिवसांत बिबट्याने तीन बालकांचा बळी घेतला. अनेक शेतकऱ्यांची जनावरे बिबट्यांकडून फस्त होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह जनावरांना वाचविण्यासाठी तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करा, अशी कैफियत आमदार मोनिका राजळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या पुढ्यात मांडली.
पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, पुरुषोत्तम आठरे, विष्णुपंत अकोलकर, सुनील ओहोळ, सुनील परदेशी, काकासाहेब शिंदे, एकनाथ आटकर, सुभाष केकाण, शिवाजी मोहिते यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामीण भागात निर्माण झालेल्या भीतीदायक वातावरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. केळवंडी, मढी, कासार पिंपळगाव, शिरापूर बुधवंतवस्ती या भागात बिबट्याने हल्ला केल्याचे प्रकार समोर आले आहेत. कासार पिंपळगाव, जवखेडे, तिसगाव, धामणगाव, रांजणी, केळवंडी, माणिक दौंडी, वृद्धेश्वर डोंगर परिसर, मायंबा डोंगर परिसरात बिबट्याने शेतकऱ्यांकडील अनेक पाळीव जनावरे ठार केली आहेत. त्यात बिबट्या नरभक्षक बनल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.जनावरे ठार केली आहेत. त्यात बिबट्या नरभक्षक बनल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.