सातारा -जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 18 करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी बुधवारी दिली. गेल्या दहा-बारा दिवसांत बाधितांचे प्रमाण कमी होत असताना काल (दि. 13) फक्त सात बाधितांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले होते; परंतु आज पुन्हा करोनाबळींचा आकडा वाढल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागासमोरील आव्हान कायम आहे. जिल्ह्यात करोनाबळींची एकूण संख्या 1399 झाली आहे.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार सुरू असताना कोडोली, ता. सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, मसूर, ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, सोमर्डी, ता. जावळी येथील 70 वर्षीय पुरुष, जैतापूर, ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष,
385 नागरिक करोनामुक्त जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 385 करोनाबाधितांना बुधवारी घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर 594 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 54, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 16, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 19, कोरेगाव येथील 50, खंडाळा येथील 55, रायगाव येथील 82, पानमळेवाडी येथील 132, महाबळेश्वर, दहिवडीतील प्रत्येकी दहा, पाटण नऊ, खावलीतील 33, तळमावले येथील 21 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 56, अशा एकूण 594 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
=================