महाबळेश्वर – शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हा व तालुका स्तरावर ‘राज्य रयतेचे, जिजाऊंच्या शिवबाचे’ अभियानांर्गत स्वराज्य सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. या सप्ताहात गावोगावच्या मुख्य चौकांमध्ये स्वराज्य पताका लावणे, स्वराज्य ज्योतीची शोभायात्रा आणि अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यानिमित्त काढण्यात आलेल्या स्वराज्य ज्योत आणि स्वराज्य पताका यात्रेचे महाबळेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे लतिफ तांबोळी, अभिजित कदम, बाप्पा सावंत, प्रकशजी काटकर, निवासी शिंदे, राजेंद्र राजपुरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दुर्गामाता पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. अॅड. संजय जंगम यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले.
लतिफ तांबोळी आणि अमित कदम यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मुख्य बाजारपेठेतून स्वराज्य ज्योत व स्वराज्य पताका शोभायात्रा काढण्यात आली. माजी नगराध्यक्ष युसूफ शेख, माजी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगरसेवक संदीप साळुंखे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि महाबळेश्वर अर्बन बँकेचे चेअरमन दत्ताजी वाडकर, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रोहित ढेबे, विमल पारठे, ज्योती वागदरे, सुरेखा देवकर, बेबी शेख, विशाल तोष्णीवाल, प्रकाश पाटील, समीर सुतार, तौफिक पटवेकर, इरफान शेख, रामदास जाधव, अर्बन बँकेचे संचालक जावेद वलगे, संजय जंगम, अनिकेत रिंगे, सचिन ढेबे, संदीप मोरे, पदाधिकारी व कार्यकर्ते शोभायात्रेत सहभागी झाले होते.