रहिमतपूर -राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम चंद्रावर बेताल आणि अक्षय केले . त्यांच्या वक्तव्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे रहीमतपुर मंडल अध्यक्ष भीमराव पाटील यांनी केली आहे .
याबाबत भीमराव पाटील यांनी रहिमतपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केला आहे . यावेळी त्यांनी म्हटले की श्री प्रभू श्रीराम हे संपूर्ण भारत वासियांचे आणि हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत आहेत.
श्री प्रभू राम यांना संपूर्ण भारत मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखतो. अशा प्रभू श्री रामाबद्दल प्रत्येक हिंदू धर्माच्या मनात अत्यंत आदर व सन्मान आहे. आमदार आव्हाड यांचे विधान जाणीवपूर्वक व समाजामध्ये द्वेष तसेच जातीय तेढ निर्माण करणारे आहे . धार्मिक भावना दुखावल्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी . यावेळी भीमराव पाटील यांच्यासह वाठारचे सरपंच सुनील कांबळे, उपसरपंच ज्ञानदेव गायकवाड , तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव गायकवाड , युवा नेते चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.