नगर – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनदेश यात्रेचे आज नगर शहरात आगमन झाले त्या निमित्ताने नवनागापूर येथे त्यांचे भव्य स्वागतही करण्यात आले. सुमारे तासभर उशिरा आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील बसच्या वरच्या भागात आलेल्या मुख्य्मंत्र्यानी हात उंचावून अभिवादन करताच त्यांना भारतीय जनतापक्षाचे झेंडे दाखवून नगरकरांनीही तितक्याच आपुलकीने अभिवादन केले.
नवनागापूर यथील कार्यकर्त्यांनी 20 फुटी हार क्रेनच्या सहाय्याने मुख्यमंत्री पालकमंती ना.शिंदे, ना.विखे आणि पक्षाचे शहर हिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांना घालण्यात आला यावेळी एकच जल्लोष करण्यात आला.मुख्य्मंत्र्यांनी पुन्हा एकदा हात वर करून अभिवादन केले. यावेळी नागापूर चौकात उद्योजकांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार करून त्यांना उद्योजकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी नागरीकांना आवरतांना पोलीसांची मोठीच दमछाक झाली यात्रा मार्गस्थ झाल्यावरही वाहतूक सुरळीत होण्यास सुमारे तासभर वेळ लागला. नगर शहरात या जनादेश यात्रेमुळे जागोजागी वाहतुक खोळंब्याला नागरीकांना सामोरे जावे लागले.
नागरिकांना मात्र दंडुक्यांचा प्रसाद
जनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा रोड शो करण्यात आला यानिमित्ताने बऱ्याच ठिकाणी वाहतूक अन्य रस्त्यांनी वळविण्यात आली. मात्र हे करत असताना पोलीस कर्मचारी आणि नागरीकांत बाचाबाचीचे प्रसंग निर्माण झाले सर्जेपुरा भागात नागरीकांना अन्य रस्त्यांनी जाण्यास सांगतांना पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.