Lok Sabha Election 2024 । महाराष्ट्राने देशात अनेक वर्ष राजकीय स्थिरता दिली आहे. काही स्वप्न अधुरी राहिले की आत्मा भटकता राहतो. महाराष्ट्र हे भटक्या आत्म्याचा शिकार झालेले आहे. 45 वर्षांपूर्वी येथील एका नेत्याने या खेळाला सुरवात केली. तेव्हापासून राजकीय अस्थिरतेचा खेळ सुरू झाला. ते केवळ विरोधकांना अस्वस्थ करत नाही, ही आत्मा कुटुंबाला देखील सोडत नाही, अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पुण्यातील रेसकोर्स येथे पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावर आता शरद पवार नेते जयंत पाटील यांनी ट्विट करत टीका केली आहे.
Lok Sabha Election 2024 । नेमकं काय म्हणाले जयंत पाटील
‘नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यावर केवळ पवार साहेबांवरच बोलणे त्यांच्यावर टीका करणे, याशिवाय देशाच्या पंतप्रधानांना काही बोलताच येत नाही. आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत अनेकांची भाषणे ऐकली. मात्र, विरोधकांवर नाहक टीका करण्याचे काम आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केले नव्हते. मोदींचा 400 पारचा नारा आता बंद झाला आहे.
आता भाजप 200 पारही जाणार नाही. मोदी आणि शाह यांनी मराठी माणसाने तयार केलेले दोन पक्ष फोडले. याची शिक्षा मराठी माणूस त्यांना मतदानातून देणार आहे. अमित शाह यांनी गुजरातमध्ये केलेले एक काम सांगावे, अशी टीका पाटील यांनी केली.