Pm Modi on Cm । २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलून गेले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबरची तीन दशकांपासूनची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्याबरोबर घेत राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली. त्यांनतर जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून ४० आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळा गट बनवला. या गटाने भाजपाशी युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. एवढेच नाही तर या गटाचे शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर तर देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. फंडणवीसांना पमुख्यमंत्रीपदी बसवणे ही भाजपाची रणनीती असल्याचं स्पष्ट झालं.या सर्व घडामोडीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलंय.
आम्हाला मुख्यमंत्रीपदापेक्षा राज्याचं भलं अधिक महत्त्वाचं Pm Modi on Cm ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “महाराष्ट्रात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे. मागच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक (१०५) जागा जिंकूनही आम्ही मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला आहे. भाजपाने हा त्याग केवळ महाराष्ट्राच्या भल्यासाठी केला आहे. काहींना वाटत होतं की आम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून आम्ही ही सत्ता मिळवली आहे. सत्ता मिळाल्यावर आम्ही आमचा मुख्यमंत्री नेमू शकलो असतो. आम्ही फडणवीसांना मुख्यमंत्री करू शकलो असतो. परंतु आम्ही तसं केलं नाही. कारण आम्हाला राज्यातील जनतेला सांगायचं होतं की आम्हाला मुख्यमंत्रीपदापेक्षा राज्याचं भलं अधिक महत्त्वाचं आहे.
आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो… Pm Modi on Cm ।
आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो, आम्ही स्वतःसाठी जगत नाही, हा संदेश आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवायचा होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत लोकांची सहानुभूती ही आमच्याबरोबर आहे. लोकांना असं वाटतं की इतका मोठा नेता (देवेंद्र फडणवीस) एक यशस्वी मुख्यमंत्री असूनही आज उपमुख्यमंत्रीपदावर बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा एक प्रकारचा त्याग केला आहे. त्यांनी स्वतःचा सन्मान सोडून केवळ महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे सगळं केलंय.” नरेंद्र मोदी यांनी नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत यावर सविस्तर भाष्य केलं
पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या देशात पश्चिम बंगाल हे राज्य उद्ध्वस्त होतंय. कोलकाता हे शहर एके काळी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं मुख्य केंद्र होतं. परंतु, त्याचादेखील ऱ्हास होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश ही राज्ये तिथल्या घाणेरड्या राजकारणामुळे, अस्थिरतेमुळे रसातळाला गेली होती. आम्हाला महाराष्ट्राला तशा स्थितीत जाऊ द्यायचं नव्हतं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आम्हाला किंवा कुठल्याही सरकारला देशाचं हित साध्य करायचं असेल तर महाराष्ट्राला अजून मजबूत करून पुढे जावं लागेल. हेच आम्ही राज्यातील जनतेला सांगत आहोत. हाच संदेश आम्ही जनतेपर्यंत पोहोचवत आहोत आणि याला जनतेकडूनही खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.