Gautam Gambhir On Virat Kohli : – रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा (आरसीबी) स्टार फलंदाज विराट कोहली आणि कोलकाता नाइट रायडर्सचा (केकेआर) मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यात आयपीएलच्या मागील हंगामात जोरदार वादावादी झाली होती. हा वाद लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यादरम्यान झाला होता.
मात्र, या हंगामात कोहली आणि गंभीरने उभय संघांमधील सामन्यादरम्यान एकमेकांना मिठी मारली होती, तर गेल्या आठवड्यात ईडन गार्डन्सवर आरसीबी आणि केकेआर यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे हे दोन खेळाडू एकमेकांशी चर्चा करताना दिसले होते. आता गंभीरने कोहलीबरोबरच्या वादावर मौन सोडले आणि सांगितले की, जेव्हा लोकांना मसाला मिळत नाही, तेव्हा ते आमच्याबद्दल बोलू लागतात.
हा सर्व टीआरपीचा खेळ आहे. कोहली आणि मी कोणत्या प्रकारचे लोक आहोत याबद्दल मीडियाला काहीच माहिती नाही. प्रसारमाध्यमांना केवळ ‘हाईप’ निर्माण करायचा असतो, पण ‘हाईप’ सकारात्मक पद्धतीनेही निर्माण करता येतो.
‘लोकांना मसाला मिळाला नाही’ हे मी कोहलीच्या मताशी सहमत आहे. मला एवढेच सांगायचे आहे की जेव्हा जे परिपक्व व्यक्ती असतात, तेव्हा मला वाटत नाही की कोणीही त्यांच्यामध्ये यावे किंवा त्यांच्या नात्याबद्दल बोलावे. कारण शेवटी ते त्या दोघांमधील प्रकरण आहे, असे गंभीरने म्हटले आहे.