Lok Sabha Election 2024 । महाराष्ट्राने देशात अनेक वर्ष राजकीय स्थिरता दिली आहे. काही स्वप्न अधुरी राहिले की आत्मा भटकता राहतो. महाराष्ट्र हे भटक्या आत्म्याचा शिकार झालेले आहे. 45 वर्षांपूर्वी येथील एका नेत्याने या खेळाला सुरवात केली. तेव्हापासून राजकीय अस्थिरतेचा खेळ सुरू झाला.
ते केवळ विरोधकांना अस्वस्थ करत नाही, ही आत्मा कुटुंबाला देखील सोडत नाही, अशी टीका शरद पवार यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पुण्यातील रेसकोर्स येथे पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावर आता शरद पवार नेते रोहित पवार यांनी ट्विट करत सडेतोड उत्तर दिले आहे.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल!
नांदतो केवळ पांडुरंग!!
(संत एकनाथ महाराज)मोदीजी महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे.. म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच तुम्हाला महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथं येऊन विठ्ठलाचं दर्शन…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 29, 2024
रोहित पवार यांनी ट्विट केले की,’मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर रोहित पवार यांनीही त्यांना ट्विट करुन प्रत्युत्तर दिले. मोदीजी महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे.. म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच तुम्हाला महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथं येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी तुम्हाला #अस्थिर_आत्मे दिसू लागले. आता 4 जूननंतर भाजप आणि मित्र पक्षांच्या अनेकांना निवांत हिमालयात जाऊन मन स्थिर करण्याची संधी देश देणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या.’ अस रोहित पवार यांनी म्हटले आहे.
हे वाचले का ? रत्नागिरीत शेतजमीन, संपत्तीत 11 कोटींची वाढ; जाणून घ्या राजन विचारे यांची एकूण मालमत्ता…