Rajasthan Elections : देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलंच जोर धरला आहे. त्यात राजस्थानमधील राजकारणही ढवळून निघाले आहे. त्यात मुख्यमंत्री आहोम गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद हा सर्व परिचित आहे. सचिन पायलटने (Sachin Pilot) अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, मला विश्वास आहे की राजस्थानमधील लोक परंपरा मोडून त्यांचा पक्ष पुन्हा निवडून आणू इच्छितात, असे म्हणत स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली होती. दरम्यान, आता स्वतःच्याच वाक्यावरून त्यांनी युटर्न घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सचिन पायलट (Sachin Pilot)सोबतचे संबंध मागील काही दिवसांपासून कट्टर झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेहलोत यांनी पायलट यांच्यावर काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांना देशद्रोही म्हटले होते. दरम्यान, एक वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत सचिन पायलट (Sachin Pilot)यांनी या मुद्दावर भाष्य न करता आम्ही एकच असल्याचे म्हटले.
पुढे सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी, “मल्लिकार्जुन खरगे मला म्हणाले, तुला विसरावे लागेल, माफ करावे लागेल आणि पुढे जावे लागेल. एकदा बोललेले शब्द कधीच परत घेता येत नाहीत. आपण त्यापलीकडे जाऊन एकत्र काम केले पाहिजे.” असा सल्ला दिला असल्याचे सांगितले. तसेच “आमच्यासाठी, वैयक्तिक आवडी-नापसंती मागे राहिली आहेत, जेव्हा तुम्हाला राजस्थानचे लोक पहावे लागतात जे आमच्याकडून काही अपेक्षा करतात. ”
दरम्यान, सचिन पायलट (Sachin Pilot)पूर्णपणे निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. सरकार स्थापन झाल्यास त्यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, सध्या निवडणुका जिंकणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आधी निवडणुका जिंका मग काय होईल ते दिसेल. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची कोंडी झाली आहे. यावेळी पायलट (Sachin Pilot) म्हणाले की, वसुंधरा राजे यांना त्यांच्याच पक्षात बाजूला केले जात आहे.