नगर – अहमदनगर शहरातील माळीवाडा भागातील कपिलेश्वर मंदिरातील शिवपिंडीची विटंबना झाल्याची घटना घडलीये, कोणी तरी अज्ञात समाज कंटकांनी कपिलेश्वर मंदिरातील शिवपिंड धारदार शस्त्राने कापण्याचा प्रयत्न केला असून यामुळे शिवपिंडीला तडे गेल्याचे दिसून येत आहे.
शहरातील कपिलेश्वर मंदिरात हि घटना घडली आहे. अज्ञात समाज कंटकांनी कपिलेश्वर मंदिरातील शिवपिंड धारदार शस्त्राने वार केला आहे. यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या, या प्रकारामुळे नगर शहरात पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस तसेच राष्ट्रवादीचे अभिजित खोसे, प्रा. विधाते, शिवसेनेचे संभाजी कदम, विक्रम राठोड, मनसेचे नितीन भुतारे बजरंग दलाचे कुणाल भंडारी आदी घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.