Raj Thackeray on Toll Issue : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोलनाक्यांच्या मुद्द्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्याविषयी आपली भूमिका जाहीर केली होती. यासंदर्भात आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडली. राज्यातील प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभा राहणार नाही तर टोलनाके जाळून टाकण्याचा थेट इशाराच शिंदे-फडणवीस सरकारला राज ठाकरे यांनी दिला आहे.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य ठाकरे (Raj Thackeray) यांनी,“गेल्या चार दिवसांपासून अविनाश जाधव आणि इतर सहकारी ठाण्यात ५ ठिकाणी झालेल्या टोलवाढीच्या विरोधात उपोषणाला बसले होते. मला राज्य सराकरकडून एक पत्र आलंय. त्यात सगळ्या गोष्टी नमूद केल्या होत्या. कुणाकुणाला टोल नाहीये, कुणाला टोल आहे असं त्यात लिहिलं होतं. टोलचा सगळा पैसा कॅशमध्ये आहे. हा पैसा जातो कुठे? याचं होतं काय? त्याच त्याच कंपन्यांना हे टोल मिळतात कसे? त्यानंतरही रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हा पैसा जातो कुठे? आपण रोड टॅक्स भरतो, तो कुठे जातो? हे कुणालाही कळत नाही. अत्यंत घाणेरड्या परिस्थितीतले रस्ते आपल्या वाट्याला येतात”, असे काही सवाल करत राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढे त्यांनी यावेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलमुक्त महाराष्ट्रसंदर्भात केलेल्या जुन्या विधानांच्या व्हिडीओ क्लिप्स दाखवल्या. “सेना-भाजपा युती आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी होती. आत्ता काय आहे, त्याचं काय मातेरं झालंय हे कुणालाच माहिती नाही. तेव्हा हे पक्ष काय म्हणाले ते मी एकेक मिनिटाच्या क्लिपवरून दाखवतो”, असे म्हणत त्यांनी जुन्या व्हिडीओ क्लिप्स ऐकवल्या. यात ही नेतेमंडळी आपलं सरकार आल्यानंतर किंवा अमुक तारखेपर्यंत महाराष्ट्र टोलमुक्त करण्यासंदर्भात दावे करत असल्याचे दिसत आहे.
“त्यांच्याकडे दर आठवड्याला, दर दिवसाला टोलचे पैसे जात असतात. हे सगळे एवढ्या थापा मारतात. त्यानंतर त्याच त्याच पक्षाला मतदान कसं होतं, हेच माझ्यासाठी अनाकलनीय आहे”, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) यावेळी म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी रविवारी माध्यमांशी बोलताना फक्त कमर्शियल गाड्यांनाच टोल आकारणी होत असल्याच्या केलेल्या विधानावरही राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. “हे धादांत खोटं आहे. जर टोलमुक्ती झाल्यानंतरही आपण टोल देत असू, तर हे पैसे जातायत कुठे? टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यांचं काय उत्तर येतंय बघू. नाहीतर आत्ता उपमुख्यमंत्र्यांनी सांगिलंय की चारचाकी, दुचाकींना टोल नाही. मग आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभं राहून चारचाकींना टोल भरू देणार नाही. याला जर त्यांनी विरोध केला, तर आम्ही हे सगळे टोलनाके जाळून टाकू. पुढे महाराष्ट्र सरकारला काय करायचंय ते सरकारनं करावं”, अशी रोखठोक भूमिका यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी घेतली.
तसेच “याच गोष्टीसाठी आमच्या लोकांनी आंदोलनं केली. मनसैनिकांनी केसेस घेतल्या. वर हे सांगतायत असं काही नाहीचे. मग त्या केसेस काढून टाका. जर राज्य सरकार म्हणतंय चारचाकी, तीनचाकी व दुचाकीसाठी टोल घेतला जात नाहीये, याचा अर्थ हे टोलवाले लुटतायत. पुढच्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटून यावर बोलेन”, असेही राज्य ठाकरे(Raj Thackeray) यांनी यावेळी म्हटले.