आळंदी – मोदींचे बळकट सरकार येण्यासाठी राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठींबा दिला आहे. विकास, प्रगती साधताना हिंदुत्वदेखील बळकट राखण्यासाठी आम्ही मनसैनिकांनी हडपसर, शिरूर भागात बैठका घेतल्या आहेत. मोदींसाठी आढळराव यांच्यासोबत प्रत्येक मनसैनिक राहील अशी ग्वाही मनसे नेते राजेंद्र (बाबू) वागस्कर यांनी आळंदी येथे दिली.
मरकळ-आळंदी मतदारभेट दौर्यात आळंदीत झालेल्या महायुतीच्या संवाद मेळाव्यात बोलत होते. यावेळी महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव, आमदार दिलीप मोहिते पाटील, निर्मलाताई पानसरे, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, मनसेचे मकरंद पाटे, सभापती कैलासराव लिंभोरे, महाराष्ट्र प्रदुषण नियमक मंडळ सदस्य नितिन गोरे, राष्ट्रवादीचे कैलास सांडभोर, भाजपा तालुकाध्यक्ष शांताराम भोसले,
पीएमआरडीए संचालक वसंत भसे, प्रियाताई पवार, बाबा राक्षे, पप्पूदादा टोपे, युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे, प्रकाश वाडेकर, विशाल पोतले, प्रकाश कु-हाडे, किरण येळवंडे, शिवसेना शहराध्यक्ष राहुल चव्हाण, मनसे शहराध्यक्ष अजय तापकीर, आरपीआय शहराध्यक्ष योगेश रंघवे, विद्यानंद मानकर, डी. डी. भोसले पाटील, जयसिंग दरेकर, सौरभ गव्हाणे, वासुदेव तुर्की, ज्ञानेश्वर बनसोडे, अॅड. आकाश जोशी, बाबासाहेब ठाकूर, रामभाऊ भोसले, अॅड. बंडूनाना काळे, विमलताई ठाकूर, संगिता फपाळ, शुभम बालघरे यांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आढळराव म्हणाले की, मागीलवेळी मी हरलो तरी पाच वर्षे जनतेच्या सुखदुखात राहिलो आहे, त्यामुळे जनता जनार्दन माझ्या पाठीशी आहे. आमदार दिलीप मोहिते यांनीही मार्गदर्शन केले.