* भारत जोडो यात्रेचा राज्यातील सहावा दिवस,हिंगोली मधील दुसरा दिवस
* महाराष्ट्रातील लोककलेतून राहुल गांधींचे ठीक ठिकाणी जंगी स्वागत
हिंगोली: (शिवशंकर निरगुडे ) : दहा हजार कोल्हापूरकरांनी भगवे फेटे बांधून केले स्वागत करीत कुस्तीचे प्रात्यक्षिक, काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. काल ही यात्रा हिंगोलीत दाखल झाली असून या यात्रेचा हिंगोली जिल्ह्यातील आजचा दुसरा दिवस सकाळी सहा वाजता राहुल गांधी कळमनुरीच्या दिशेने रवाना झाले आहेत. येथे मोठ्या प्रमाणात राज्यभरातील कॉंग्रेस कार्यकर्ते हिंगोलीत यात्रेचं स्वागत केलं आहे.
यात्रेचं स्वागत करण्यासाठी कोल्हापूरवरुन दहा हजार नागरिक हिंगोलीत दाखल झाले आहेत.सर्व नागरिक लाल फेटे बांधून राहुल गांधी यांचे स्वागत करतील.राहुल गांधी यांना खास कोल्हापुरी कुस्ती या ठिकाणी पाहायला मिळाली आहे.तर यात्रा आज हिंगोली जिल्ह्यातील दाती फाटा येथून कळमनुरीच्या दिशेने निघाली आहे.राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला आणि बुलढाणा अशा 5 जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.या यात्रेत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली आहे.
घोषणांनी परिसर दुमदमला
कळमनुरी तालुक्यातील दातीफाटा येथून सकाळी निघालेली यात्रा आखाडा बाळापूरात पोहोचली.यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विश्वजीत कदम, माजीमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, प्रा. वर्षा गायकवाड, अमित देशमुख आदी प्रमुख नेते यात्रेत सहभागी झाले होते. आखाडा बाळापूर येथे यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. ‘नफरत छोडो, भारत जोडो, वो तोडेंगे हम जोडेंगे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. या ठिकाणावरून माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व त्यांचे कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते.डोक्याला फेटे बांधून सहभागी झालेले कार्यकर्ते यात्रेत चर्चेचा विषय बनले होते.
कुस्तीचे प्रात्याक्षिक दाखवले
सिंचन वसाहतीजवळ माजीमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह पदाधिकारी व कायर्कत्यांनी फेटे बांधून राहुल गांधी यांचे स्वागत केले. त्यानंतर कोल्हापूरकरांनी तेथील संस्कृतीचे दर्शन घडविले. यावेळी विविध खेळांचे प्रदर्शन घडविले.तसेच कुस्तीचेही प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. खासदार गांधी यांनी कुस्तीपट्टूंचे कौतूक केले.त्यानंतर हि यात्रा कळमनुरीकडे मार्गस्थ झाली.
रस्त्यावरील सर्वसामान्यांची चौकशी
आखाडा बाळापूरात शेवाळा रोड भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या साधना धांडे व शिवा धांडे यांंना बोलावून राहुल गांधींनी त्यांची चौकशी केली. याबाबत साधना धांडे यांनी सांगितले की, राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा येणार हे माहिती होते. मात्र गांधी यांची भेट होईल असे स्वप्नातही वाटले नाही.आज सकाळी यात्रेच्या स्वागताच्या निमित्ताने शेवाळा रोड भागात मी व माझे पती शिवा धांडे उभे होते. यावेळी खासदार गांधी यांचे लक्ष गेले अन् त्यांनी आम्हाला हात दाखवून बोलावले. मात्र एवढी मोठे व्यक्ती आम्हा सामान्यांना कशाला बाेलावतील, असे म्हणून दुर्लक्ष केले.
मात्र त्यांनी पुन्हा बोलावल्यानंतर थोडी भिती वाटली.पण,त्यांच्यापर्यंत पोहोचलो. राहुल गांधी यांनी ‘कैसे हो दिदी असे शब्द उच्चारताच तोंडतून शब्दही फुटेणासे झाले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांची झालेली भेट स्वप्नवतच आहे. मात्र हा अमुल्य ठेवा आम्ही आयुष्यभर जपणार असल्याचे साधना धांडे यांनी सांगितले. ॲटो चालक शिवा धांडे यांच्याशी संवाद साधतांना तुम्ही काय व्यवसाय करता, दिवसभरात किती रुपये मिळतात, असे प्रश्न विचारून राहुल गांधींनी विचारल्याचे शिवा धांडे यांनी सांगितले.