मुंबई : राज्यातील आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. या टीकेनंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. ‘उद्योग परराज्यात गेले, हे महाविकासआघाडीचे पाप आहे. ते आमच्या माथी मारू नका, जनता सुज्ञ आहे. वो सब जानती है’ असे म्हणत सामंत यांनी महाविकासआघाडीलाच यासाठी जबाबदार धरले आहे.
‘मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री गलिच्छ राजकारणात मग्न आहे, असा शोध आज कुणीतरी लावला. नक्की गलिच्छ राजकारण कोण करत आहे हे महाराष्ट्रातील जनतेला खासदार गजानन किर्तीकरांनी सांगितले आहे’, असेही सामंत यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळेंनी काही वृत्तपत्रातील वृत्ताचा हवाला देत, ऊर्जा निर्मिती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका केली आहे.
मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री गलिच्छ राजकारणात मग्न असा शोध आज कुणीतरी लावला,मा. खा.गजानन कीर्तिकर यांनी नक्की गलिच्छ राजकारण कोण करतय हे महाराष्ट्रातील जनतेला आज सांगितलं आहे.उद्योग परराज्यात गेले हे मविआ चे पाप आहे, ते आमच्या माथी मारू नये, जनता सुज्ञ आहे, “वो सब जानती है”.🚩
— Uday Samant (@samant_uday) November 12, 2022
त्यावर बोलताना”मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री गलिच्छ राजकारणात मग्न असा शोध आज कुणीतरी लावला,मा. खा.गजानन कीर्तिकर यांनी नक्की गलिच्छ राजकारण कोण करतय हे महाराष्ट्रातील जनतेला आज सांगितलं आहे. उद्योग परराज्यात गेले हे मविआ चे पाप आहे, ते आमच्या माथी मारू नये, जनता सुज्ञ आहे, “वो सब जानती है”.?” असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
तर “एवढा मोठा प्रकल्प दोन ते तीन महिन्यात इकडून तिकडे जाऊ शकतो का? ही काय जादूची कांडी आहे का? बोलण्याला पण काही अर्थ असला पाहिजे”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर प्रत्येकवेळी प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर कांगावा करणं चुकीचं आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.