Rahul Gandhi-Akhilesh Yadav। समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी आज सकाळी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत. सध्याचे सरकार प्रश्नांवर बोलत नसल्याचा आरोप केला.
पंतप्रधान मोदी मुद्द्यांवर बोलत नाहीत Rahul Gandhi-Akhilesh Yadav।
या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी, “पंतप्रधान मोदी आणि भाजप मुद्द्यांवर बोलत नाहीत. “ही निवडणूक विचारधारेची निवडणूक आहे. एकीकडे आरएसएस आणि भाजप संविधान, लोकशाही व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष संरक्षण आणि वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.”असे म्हटले.
राहुल म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत दोन-तीन मोठे मुद्दे आहेत. त्यात बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा महागाईचा आहे. पण भाजप जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यात व्यस्त आहे, ना पंतप्रधान ना भाजप मुद्द्यांवर बोलत नाहीत.” असे त्यांनी म्हटले.
पंतप्रधानांना इलेक्टोरल बाँड्सवर प्रश्न विचारला Rahul Gandhi-Akhilesh Yadav।
इलेक्टोरल बाँड्सबद्दल बोलताना राहुल म्हणाले, “काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी एएनआयला खूप मोठी मुलाखत दिली होती. ती स्क्रिप्टेड होती, जी फ्लॉप शो ठरली. पंतप्रधानांनी मुलाखतीदरम्यान इलेक्टोरल बाँड्सचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान पारदर्शकतेसाठी आणि राजकारण स्वच्छ करण्यासाठी निवडणूक बाँडची व्यवस्था आणल्याचे मोदींचे म्हणणे आहे.
काँग्रेस नेते पुढे म्हणाले, “सर्वप्रथम, जर हे खरे असेल तर सर्वोच्च न्यायालयाने ती प्रणाली का रद्द केली. दुसरे म्हणजे, जर तुम्हाला पारदर्शकता आणायची होती तर तुम्ही भाजपला पैसे देणाऱ्यांची नावे का लपवली. त्यांनी तुम्हाला कोणत्या आधारावर पैसे दिले ते का लपवा?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यासोबतच “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत,” अशी राहुल गांधींनी सडकून टीका केली.
यावेळी अखिलेश यादव यांनी, “इंडिया आघाडी गाझियाबादपासून गाझीपूरपर्यंत भाजपचा सुपडा साफ करेल असा विश्वास व्यक्त केला. आज शेतकरी दु:खी आहे, तरूण चिंतेत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते, पण उत्पन्न दुप्पट झाले नाही. भाजपने जे काही सांगितले ते खोटे आहे. भाजपने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. भाजपने दिलेली सर्व आश्वासने खोटी आहेत.असे म्हटले.