नागरिकांची खासदार सुळेंकडे निवेदनाद्वारे आर्तहाक
वाल्हे : पुरंदर तालुक्यात दुष्काळाची झळ तीव्र झाली आहे. वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी व वागदरवाडीत चारा छावणी, चारा डेपो सुरू करा. तसेच पुणे-पंढरपूर महामार्गावर महात्मा फुले पुतळ्यालगत ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग करावा, तालुक्यातील पाणीटंचाई संदर्भात लक्ष द्यावे; या मागणीचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांना सरपंचांनी तसेच ग्रामस्थांनी दिली.
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामामध्ये ठेकेदार व अधिकारी मनमानी पद्धतीने कामे करत असून स्थानिकांना विश्वासात न घेता सुरू असलेल्या कामांबाबत शुक्रवारी (दि. 19) नागरिकांनी खासदार सुळे यांच्यासमोर तक्रारी सांगितल्या, त्यावेळी वरील मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, वाल्हे सरपंच अतुल गायकवाड, वागदरवाडी सरपंच सुनील पवार, सुकलवाडी सरपंच संदेश पवार, माजी सभापती गिरीश पवार, बबुसाहेब माहूरकर, माजी सरपंच महादेव चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सागर भुजबळ, उद्योजक गोरख कदम, हनुमंत पवार, बजरंग पवार, दिलीप पवार आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आळंदी-पंढरपूर या पालखी महामार्गावरील वाल्हे येथील महात्मा फुले पुतळ्या जवळ व वागदरवाडी फाट्याजवळ सुरू असलेल्या कामकाजाची खासदार सुळे यांनी पहाणी करण्यासाठी आल्या असता; पदाधिकार्यांसह ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर या महामार्गाबातच्या कामकाजाच्या तक्रारीं सांगितल्या.
वाल्ह्यासह परिसरामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेला चाराप्रश्न आणि जनावरांचे हाल यावर पर्याय म्हणून जिल्हाधिकार्यांशी सुद्धा चर्चा केली जाणार आहे.
– सुप्रिया सुळे, खासदार