राज्यपालांना पत्र पाठविणार
शिक्रापूर – सध्याच्या शासनाच्या शाळा खासगीकरण धोरणाच्या विरोधात शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समितीच्या माध्यमातून शनिवारवाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालयावर काढलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शिरूर तालुक्याच्या अनेक शाळेतील शिक्षक सहभागी झाले असल्याने शिरूर तालुक्यातील अनेक शाळा शुक्रवारी (दि. 13) पूर्णपणे बंद असल्याने शाळा परिसरात पूर्णपणे शुकशुकाट दिसून आला आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समितीच्या वतीने शनिवारवाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालयावर काढलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शाळा पूर्णपणे बंद होत्या.
कान्हूर मेसाईच्या विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे म्हणाले की, आमची पूर्ण शाळा या आंदोलनात सहभागी असून शिरुर तालुक्यातील बहुतांश शाळा शुक्रवारी (दि. 13) बंद असताना सर्व शिक्षक व सेवक या मोर्चात सहभागी झाले होते. शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्वच शाळा संपात सहभागी असताना
शैक्षणिक धोरणाच्या विरोधात विद्यार्थी देखील असून लवकरच सर्व विद्यार्थी पोस्टकार्डवर राज्यपालांना पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामशिक्षण संस्था टाकळी हाजीचे संस्थापक माजी आमदार पोपटराव गावडे व विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष गंगाधर पुंडे यांनी शासनाच्या या धोरणाचा फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
या धोरणांना आहे विरोध
समहू शाळा योजना, शाळा दत्तक योजना, शाळांचे खाजकीकरण, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण, सेवानिवृत्त शिक्षक व सेवकांची रिक्त पदे भरली न गेल्याने अतिरिक्त कामाचा बोजा, पवित्र पोर्टलवर भरतीसाठी अक्षम्य विलंब, शिक्षकांना अशैक्षणिक कामाचा वाढता बोजा.