राजगुरुनगर – “पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा आहे, हाच वारसा जपण्यासाठी व प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी (काळूस) मधील बालचमूंनी आणि शिक्षकांनी पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात आयोजन केले होते.
शाळेच्या शिक्षिका स्नेहा गहिणे यांनी या विद्यार्थ्यांना आपल्या वारकरी संप्रदायाची माहिती आणि अनुमती येण्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांची पंढरीचीवारी काढली. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेतील मुलांच्या या उपक्रमाची सुरुवात पालक महिलांनी विठ्ठल रखुमाई प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर शाळेच्या मैदानात वारीची सोहळा रंगला.
वारकऱ्यांच्या वेशात मुलांनी रिंगण करून हरी नामाचा गजर केला. पालक महिला भगिनींनी अभंग भजन गायन केले. फुगड्या खेळून दिंडीतील आपला आनंद व्यक्त केला. शाळेच्या शिक्षिका स्नेहा गहिणे यांनी कथेद्वारे विठ्ठलाचा महिमा सांगितला.
दिंडी सोहळ्यात सहभागी पालक व गावातील महिलांनी आषाढी वारीचा प्रत्यक्ष अनुभव आणि आनंद मिळाला शाळेचे अध्यक्ष अवधूत पोपट गायकवाड, ज्योती गायकवाड, विद्या गायकवाड, कोमल भुजबळ, रूपाली अवधूत गायकवाड, शिवाजी भुजबळ, ममता गायकवाड, मोनिका भुजबळ, कल्पना सुधीर गायकवाड, ज्योत्स्ना गायकवाड, आशा गायकवाड यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सहभाग नोंदवला. दिंडी सोहळ्यातील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.