धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाळणा गात अनोखे आंदोलन
बारामती – धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी क्रांतीशौर्य सेनेच्या वतीने (दि.७) दिल्ली येथील जंतर मंतर मैदानात आरक्षणाचा पाळणा गात अनोखे निषेध आंदोलन केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विशेष लक्षवेधी घेत सरकारने याची दखल घ्यावी. यासाठी याठिकाणी यळकोट यळकोट… जय मल्हार, आरक्षण अमलबजावनी झालीच पाहिजे… एसटी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे… ओबीसी जनगणना झालीच पाहिजे… या घोषणांनी जंतर मंतर मैदान दणाणले.
यावेळी या महिलांनी बाळा जो जो रे… हे अंगाई गीत गात सरकारला झोपवण्याचा इशारा पाळणा आंदोलनातून दिला. खासदार विनायक राऊत यांनी आंदोलनकर्त्याची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाला दिलेल्या शब्दांचे पालन करावे, धनगर जमातीला अनुसूचित जमातीची अंमलबजावणी करावी अशी मागणी आंदोलनकर्त्या कल्याणी वाघमोडे यांनी केली.
येणाऱ्या लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये धनगर समाज मतांमधून आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, याची दखल राज्य व केंद्र सरकारने घ्यावी, असे परखड मत कल्याणी वाघमोडे यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या भवन कार्यालय मधे निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी भेट देत समर्थन देत मत व्यक्त केले.
देशभरातील माजी मंत्री, पदाधिकारी सहभागी
यावेळी जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष हरीभाई पटेल, उत्तर प्रदेश सरकारचे माजी राज्यमंत्री सतीश पाल, रिटायर्ड एसीपी सूर्यकांत पाटील, मधुसूदन होळकर, रमेश वर्मा, अजय पाल सिंग, रामप्रकाश होळकर, पवन पाल, जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष हरीभाई पटेल, उत्तर प्रदेशचे माजी राज्यमंत्री सतीश पाल, महाराष्ट्र महाराष्ट्रातून सरपंच बाळासाहेब जोशी, पंचायत समिती सदस्य विठ्ठल आदमाने, आशा रुपनवर, अश्विनी पाटील, लक्ष्मी करे, वृषाली मासाळ, रोहिणी मार्कड आदींसह महिला भगिनी उपस्थित होत्या. सर्व बंधू भगिनी या ठिय्या आंदोलन मधे मोठ्या संख्येने उपस्थित होते.