नवी दिल्ली – दिल्लीत आज सकाळी अचानक हवामान खराब झाल्याने दिल्लीत येणारी पंधरा विमाने अन्यत्र वळवावी लागली आहेत अशी माहिती विमानतळ सूत्रांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ फ्लाइट जयपूर, दोन अमृतसर, दोन लखनौ, एक मुंबई आणि एक चंदीगडला वळवण्यात आली.
मंगळवारी संध्याकाळी दिल्लीच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने राष्ट्रीय राजधानीत हवामानात अचानक बदल झाला. तत्पूर्वी, भारतीय हवामान खात्याने रविवारी सांगितले की येत्या २-३ दिवसांत दिल्लीतील तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे आणि सोमवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एएनआयशी बोलताना वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ नरेश कुमार म्हणाले की, पुढील ४-५ दिवसांत पूर्व भारतात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.त्याप्रमाणे दिल्लीतही तापमान वाढण्याची शक्यता असून दिल्लीत त्या बरोबरच पाऊसही पडू शकतो.