विश्रांतवाडी – पुणेकरांकडून वसूल केला जाणारा भरमसाठ मिळकत कर कुठे तरी विना नियोजित प्रकल्पांना लावायचा आणि नागरिकांच्या कोट्यवधींच्या मिळकराचे कसान करायचं हे महापालिकेचे काम आहे. अवघ्या सात वर्षांमध्ये बीआरटी प्रकल्पामुळे पुणे शहराला किती प्रमाणात फायदा झाला याच उत्तर महापालिकेने जनतेला देणे गरजेचे आहे, अस आव्हान लोहगावचे युवा नेतृत्व सुशांत माने यांनी प्रशासनास केले आहे.
बीआरटीच्या माध्यमातून पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्याचा महापालिकेचा प्रामाणिक प्रयत्न होता. परंतु, बीआरटी मार्गामुळे पुणे शहराची वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. उदाहरणार्थ नगर रोडला 33 कोटी रुपये खर्च करून बीआरटी मार्ग बनवण्यात आला. या बीआरटी मार्गामुळे येरवडा ते चंदन नगर हे एक अपघाताचे केंद्र बनलं होतं. या बीआरटीच्या मार्गातून अनेक खासगी वाहने मोठ्या वेगाने सुसाट वाहत होती. या गोष्टींकडे बीआरटी अधिकाऱ्यांचं किंवा पालिका प्रशासनाचे लक्ष नव्हते.
या वाहतूक कोंडीला सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते, या वाहतूक कोंडीतून मार्ग काढणारी रुग्णवाहिकेची दमछक होत होती.
आज नगर रोडची वाहनांची संख्या पाहिली तर लाखो वाहन दिवसभर ये जा करतात. त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. गेली सात वर्ष पुणे महापालिकेच्या विना नियोजित प्रकल्पाचा परिणाम नगर रोडवरच्या रहिवाशांना भोगावा लागला. आमदार सुनील आण्णा टिंगरे यांनी या वाहतुकीचा अभ्यास करून हाच प्रश्न विधिमंडळामध्ये सादर केला होता, सदर सत्य परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाने नगर रोड वरचा बीआरटी मार्ग हटवण्यास निर्देश दिले, असे माने यांनी सांगितले.