राजगुरूनगर – खेड तालुक्यात लॉकडाऊन काळात मे महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात आता घर, जमिनी खरेदीचे व्यवहारातून सहा महिन्यांत जवळपास 43 कोटी रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे.
राज्य शासनाने दस्त नोंदणी “फी’मध्ये कपात केल्याने मोठ्या प्रमाणात तालुक्यात व्यवहार झाले आहेत. सध्या दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी विक्रीचे व्यवहारासाठी होणाऱ्या गर्दीचा विचार करता मोठ्या प्रमाणात महसूल जमा होणार आहे.
राजगुरूनगर येथे दोन तर चाकण येथे एक अशी तीन दुय्यम निबंधक कार्यालये खरेदी खताचे व्यवहार करण्यासाठी गर्दीने फुलुन गेली आहेत. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर घरे, फ्लॅट, जमीन व्यवहार मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने तीनही कार्यालये रात्री आठ वाजेपर्यंत सुरू आहेत.
मे ते ऑक्टोबरअखेरपर्यंत तीनही कार्यालयांमध्ये 7 हजार 329 एकूण झालेल्या विविध खरेदीपोटी 37 कोटी 10 लाख 90 हजार 603 रुपये मुद्रांक शुल्क जमा झाले. नोंदणी फीचे 5 कोटी 41 लाख 74 हजार 515 रुपये मिळून एकूण 42 कोटी 52 लाख 65 हजार 18 रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले आहे, अशी माहिती राजगुरूनगर तहसील कार्यालय परिसरातील सहायक दुय्यम निबंधक संजय कातोरे, खेड बाजार समिती आवारातील सहायक दुय्यम निबंधक रोहिणी तागंडे तर चाकण येथील ए.आर.कणसे यांनी दिली.
मे ते ऑक्टोबर या कालावधीत जमा महसूल (रुपयांत)
दुय्यम निबंधकदस्तमुद्रांक शुल्कनोंदणी फीएकूण
तहसील कार्यालय188810 कोटी 91 लाख 1 कोटी 64 लाख12 कोटी 55 लाख
40 हजार 95037541 हजार 325
खेड बाजार समिती21628 कोटी 49 लाख1 कोटी 46 लाख 9 कोटी 95 लाख
28 हजार 13526 हजार 34054 हजार 475
चाकण32797 कोटी 70 लाख 2 कोटी 31 लाख 20 कोटी 1 लाख
21 हजार 51847 हजार 80069 हजार 18
शहरात 4 तर ग्रामीणमध्ये 3 टक्के मुद्रांक शुल्क
खेड तालुक्यातील खरेदी विक्रीचे व्यवहारांना गती येऊ लागल्याने राज्याच्या तिजोरीत कोट्यवधींची भर पडू लागली आहे. सर्वसाधारण विचार करता जमिनीच्या आणि घरांच्या व्यवहारात शहरी शेकडा 4 टक्के तर ग्रामीणला 3 टक्के मुद्रांक शुल्कापोटी आकारले जातात. या कपातीमुळे तालुक्यात करोडो रुपयांची उलाढाल झाली आहे.
कार्यालयांभोवती एजंटांचा गराडा
सध्या चाकण औद्योगिक टप्यातील पाचव्या टप्यातील भूसंपादनातून कोट्यवधी रुपयांचा मोबदला वाटप सुरू आहेत तर भामा आसखेड धरणग्रस्तांना आता पुर्नवसनाच्या जमिनीऐवजी मोबदल्याचे पॅकेज म्हणून रक्कम वाटपास सुरू केली आहे.
चाकण परिसरात कोट्यवधींच्या उड्डाणामुळे महागड्या गाड्याबरोबरच खरेदीखतांचे व्यवहार धुमधडाक्यात सुरू आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जमिनी पहाण्यासाठी गाड्यांचा ग्रामीण भागात धुराळा उडू लागला आहे. निराशेत गेल्याने सुस्तावलेल्या एजंट मंडळीचा आता कार्यालयाभोवती गराडा पडू लागला आहे.