पाती पडल्या पिवळ्या : शेतकरी चिंतातूर
चिंबळी – खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सातत्याने असलेल्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोग पडला असून पाती पिवळ्या पडल्या असल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.
चिंबळी, मरकळ, कुरुळी, मोई, निघोजे आदी परिसरातील शेतकर्यांनी उपलब्ध असलेल्या पाण्यावर कांदा या नगदी पिकाचे उत्पादन घेतले आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण आहे.
तसेच या आठ दिवसांमध्ये वातावरणातील झालेल्या बदल्यामुळे विहरींचे पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले असल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे.
उपलब्ध पाण्यावरील पाण्यावर बाकीचे पिके न घेता हमखास उत्पादन मिळेल या आशेवर या भागातील शेतकर्यांनी कांदा पिकाचे उत्पादन घेतले. मात्र तोंडात घास घालण्याची वेळ आली असतानाच आलेला कांद्यावर पडलेल्या रोगामुळे या भागातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.