पुणे – विकसन करार केलेला असताना देखील जमीन दुसऱ्याचे नावे करत फसवणुक करुन ३० काेटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यातील लष्कर पाेलीस ठाण्यात दाेन जणांविराेधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनेसा डाेनाल्ड डिसुझा (रा.एम.जी.राेड,पुणे) व अली अकबर जाफरी (रा.कॅम्प,पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे.
याबाबत हेमंत बागारेड्डी मेटाडु (वय-५८, रा.कॅम्प,पुणे) यांनी लष्कर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अली जाफरी यांनी हेमंत मेटाडु यांचे मालकीची हवेली तालुक्यातील चऱ्हाेली येथील जमीन हिरानंदानी प्राॅपर्टीज प्रा.लि. तर्फे निरंजन हिरानंदानी यांना करार करुन २००५ मध्ये लिहून दिली. त्यानंतर अली जाफरी यांनी फसवणुक करण्याचे उद्देशाने संबंधित जमीन वनेसा डिसुजा यांचे नावे करुन खरेदीखत केले.
१६ जुलै राेजी पुणे कॅम्प मधील हाॅटेल काेहिनुर येथे हेमंत माेटाडु यांना आराेपींनी बाेलवुन घेत ३० काेटी रुपये खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुमचे माेठे आर्थिक नुकसान करु असे सांगत पैसे देण्याकरिता दबाव टाकला. याबाबत पाेलीसांकडे अर्ज आल्यानंतर पाेलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.