भोपाळ – कॉंग्रेसला मध्यप्रदेशातील पराभव दिसू लागल्यानेच त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हिंसाचाराचा आरोप सुरू केला आहे असा दावा भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला आहे. राज्यातील ईव्हीएम मशिनच्या संबंधातहीं आता कॉंग्रेसने तक्रारी सुरू केल्या आहेत असे त्यांनी नमूद केले.
त्या म्हणाल्या की, जेथे ते जिंकतात तिथे मशीन (ईव्हीएम) त्यांच्यासाठी ठीक असतात आणि ते हरल्यावर मशीनला दोष देतात. त्यांचे आरोप निराधार आहेत.राजकीय हिंसाचार ही कॉंग्रेसची संस्कृती असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी दावा केला की त्यांच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याला भाजपच्या उमेदवाराने त्यांच्या वाहनाने धडकवून छतरपूरमध्ये खाली पाडले, परंतु पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही, पोलिसांनी अद्याप वाहन जप्त केलेले नाही किंवा उमेदवाराला अटकही केलेली नाही.
मुरैना जिल्ह्यातील दिमानी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र 147-148 वर हिंसाचाराची नोंद झाली जेव्हा दोन बाजूंनी दगडफेक झाली. दगडफेकीत एक जण जखमी झाला.