PM Narendra Modi : “गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेस सरकारने राजस्थानला उद्ध्वस्त केलं आहे. गुन्हेगारीच्या बाबतीत राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे, हे पाहून खूप वाईट वाटतं. महिलांविरोधातील गुन्ह्यांची, अत्याचाराची सर्वाधिक प्रकरणं राजस्थानमध्येच पाहायला मिळत आहेत. तुम्ही यासाठीच काँग्रेसला मतदान केलं होतं का?” पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हा सवाल केला आहे. ते राजस्थानमध्ये बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. चित्तोडगड येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल ७,००० कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या विकासकामांची पायाभरणी केली. या वर्षाच्या अखेरीस राजस्थान विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा चित्तोडगड दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. निवडणुकीच्या आधी केंद्र सरकार राजस्थानसाठी वेगवेगळ्या घोषणा करत आहे. दरम्यान, चित्तोडगडच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, राजस्थानचा विकास ही केंद्र सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आयोजित कार्यक्रमात बोलताना, ‘गेल्या पाच वर्षांमध्ये काँग्रेस सरकारने राजस्थानला उद्ध्वस्त केलं आहे. गुन्हेगारीच्या बाबतीत राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे, हे पाहून खूप वाईट वाटतं. महिलांविरोधातील गुन्ह्यांची, अत्याचाराची सर्वाधिक प्रकरणं राजस्थानमध्येच पाहायला मिळत आहेत. तुम्ही यासाठीच काँग्रेसला मतदान केलं होतं का?” असा सवाल त्यांनी केला.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी, केंद्र सरकार राजस्थानच्या विकासाला प्राधान्य देत आहे. आम्ही राजस्थानमध्ये एक्सप्रेस हायवे आणि रेल्वेसारख्या आधुनिक पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे असो, अथवा अमृतसर-जामनगर एक्सप्रेसवे असेल, हे मार्ग राज्थानमधील लॉजिस्टिकशी संबंधित सेक्टरला नवीन शक्ती देतील. काही दिवसांपूर्वी उदयपूर-जयपूर वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे, असे म्हटले आहे.
त्यासोबतच नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, राजस्थान हे भारतमाला प्रकल्पांतर्गत सर्वाधिक व्यापार करणारं राज्य आहे. राजस्थानचा इतिहास आपल्याला वीरता आणि वैभव एकत्र घेऊन पुढे कसं जायचं ते शिकवतो. आपण त्याप्रमाणे चाललं पाहिजे., असे आवाहन त्यांनी केले.