PM Modi In Nawada । लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सभा घेत आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपला मते देण्यासाठी ते आवाहन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये एका सभेला संबोधित करत विरोधकांवर निशाणा साधला. त्यासोबतच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे वाढलेले महत्व याविषयी सांगताना पाकिस्तानवर टीका केली.
सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी, मोदींनी देशाला गॅरंटी दिली होती कि जे देशाकडे वाईट नजरेने बघतील त्यांनाच चांगला धडा शिकवला जाईल, ‘जे आधी भारतावर डोळे वटरायचे, ते आता पीठासाठी भटकतात’ असे म्हणत त्यांनी पाकिस्तनावर टीका केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कलम 370 बाबतच्या वक्तव्यावर पीएम मोदी म्हणाले, “काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले की मोदी राजस्थानमध्ये येतात आणि जम्मू-काश्मीरबद्दल बोलतात. तुकडे तुकडे टोळीचे लोक असे बोलतात. आम्ही शहीदांचा अपमान सहन शकत नाही.” असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. दरम्यान, जयपूरमध्ये काँग्रेसचा जाहीरनामा जारी करताना काँग्रेस अध्यक्षांनी मोदींची हमी, चीन आणि पाकिस्तानसह अनेक मुद्द्यांवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता.
‘इंडिया आघाडीचे लोक घाबरले’ PM Modi In Nawada ।
मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर निशाणा साधत ते पुढे म्हणाले, “मोदींच्या हमी इंडिया आघाडीला पसंत पडत नाहीत. मोदी जी हमी देतात त्यावर बंदी घालावी, असे इंडिया आघाडीच्या एका मोठ्या नेत्याचे म्हणणे आहे. हे लोक मोदींचीच हमी असल्याचे म्हणतात. अरे, तुम्ही इतके घाबरलात का? तुम्हाला मोदींच्या हमीभावाची भीती वाटते का?”असा सवाल मोदींनी विचारला.
‘काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची छाप’ PM Modi In Nawada ।
काँग्रेसवर हल्ला करत पीएम मोदी म्हणाले, “इंडिया आघाडी म्हणजे देशद्रोही लोकांचे माहेरघर. इंडियाची आघाडी भारताच्या फाळणीबद्दल बोलते. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगचा ठसा दिसतो. सनातन धर्माला विरोध करणाऱ्यांना बिहार माफ करणार नाही.इंडिया आघाडीच्या नेत्याने दक्षिण भारत वेगळे करणार असल्याचे विधान केले आहे. इंडिया आघाडीचे लोक गप्प आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा अर्थ तुष्टीकरण आहे.”