नगर– दुष्काळी तालुका म्हणून नगर तालुका ओळखला जातो. स्व. मा. खा. दादापाटील शेळके यांनी यांच्या शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या भल्यासाठी खा. शरद पवार यांच्या माध्यमातून 1995 साली सहकारी साखर कारखान्याला मान्यता मिळवली. शेअर्स गोळा करून सभासदांनी कारखाना उभारला व सुरु केला. काही वर्षानंतर कारखाना तोट्यात गेल्यानंतर कारखाना बंद पडला. मात्र, आता पियुष शुगर कारखाना नगर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी व कामगारांसाठी वरदान ठरणार असल्याचे, प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.
वाळकी (ता.नगर) येथील पियुष शुगर ऍण्ड पावर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या वतीने 20-21 गळीत हंगामाचा प्रारंभ आमदार अरुण जगताप यांच्याहस्ते झाले. यावेळी कर्डिले बोलत होते. यावेळी व्यवस्थापकीय संचालक प्रल्हाद पन्हाळे, आर.एस.शिंदे, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, ज्येष्ठ नेते दादा चितळकर, शरद बोठे, दिलीप भालसिंग, रेवन्नाथ चोभे, दीपक कार्ले, बबन हराळ, सुनील कोठूळे, संयम पन्हाळे, पियुष पन्हाळे, देवराम कारास, शुभम भाबंरे, बाळासाहेब मेटे, बाळासाहेब पोटघन, राजाराम भापकर गुरूजी, अशोक टकले, हनुमंत मगर, ऍड. उद्धव मोंमले, संजय काकडे, अरविंद रेड्डी आदी उपस्थित होते.
यावेळी पन्हाळे म्हणाले की, 2014 साली हा कारखाना विकत घेऊन पहिल्या तीन मध्येच 1 लाख 80 हजार मेट्रीक टन गाळप केली. नगर तालुका हा दुष्काळी तालुका असल्यामुळे ऊसाचे उत्पन्न नाही. 100 किलोमिटर वरून ऊस आणण्याचे काम केले. कारखान्यासाठी लागणारे पाणी नसल्यामुळे पावसाच्या पाण्यावर कारखाना चालवला.