पिंपरी – भरीव मानधनवाढ, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, कामकाजासाठी नवीन मोबाइल/टॅब , ग्रॅज्युइटी,मासिक पेन्शन इ. मागण्यांसाठी ४ डिसेंबर २०२३ पासून अंगणवाडी सेविकांचे बंद आंदोलन सुरु आहे. २२जानेवारी २०२४ रोजी आंदोलनास ५० दिवस पूर्ण होत आहेत. मात्र अद्याप राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. म्हणून ज्या आमदारांच्या पाठबळावर सरकार बनते आणि चालते त्या आमदारांच्या कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने आंदोलनाची पन्नाशी आमदारांच्या दाराशी धरणे आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामुळे गेल्या 50 दिवसांपासून राज्यातील वाडी-वस्ती गावपाड्यामधील गरीब घटकातील 70 लाख चिमुकल्यांना पूरक पोषक आहार मिळाला नाही. ही बालके पूर्व प्राथमिक शिक्षणापासूनही वंचित राहिली आहेत. इतर अर्थपूर्ण विषयाकडे लक्ष पुरवणाऱ्या सरकारचे-मानवी विकासाशी संबंधित प्रश्न सोडवण्याला प्राधान्य नाही. म्हणून या आंदोलन व मागण्यांकडे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी एकाचवेळी आमदारांच्या कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी धरणे आंदोलन केले. होत आहे.
आंदोलनाला २२ जानेवारीलाच ५० दिवस पूर्ण होत आहेत. मात्र यादिवशी अयोध्येतील कार्यक्रमामुळे पोलीस यंत्रणेवर येणाऱ्या ताणामध्ये भर नको म्हणून धरणे आंदोलन दुसऱ्या दिवशी करण्यात आले. शहरातील आमदारांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.