नवी दिल्ली – देशाच्या ग्रामीण भागातील 95 टक्के नागरीकांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध असल्याचे सन 2020-2021 या वर्षात करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून दिसून आले असून शहरी भागातील 97.2 टक्के नागरीकांना ही सुविधा उपलब्ध असल्याची माहिती केंद्र सरकारच्या एका अहवालात देण्यात आली आहे.
नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या मल्टिपल इंडिकेटर सर्व्हेतून ही माहिती उपलब्ध झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. ग्रामीण भागातील 56.3 टक्के नागरीकांना आणि शहरी भागातील 76.3 टक्के नागरीकांना त्यांच्या घरातच पिण्यायोग्य पाणी मिळत असून त्याची उपलब्धता पुर्ण वर्षभर असते असेही त्यात म्हटले आहे. जानेवारी 2020 ते 15 ऑगस्ट 2021 या अवधीत देशभरात ही पाहणी करण्यात आली. ग्रामीण व शहरी अशा एकूण 2 लाख 76 हजार 409 घरांमध्ये जाऊन ही पाहणी करण्यात आली आणि त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
ग्रमीण भागातील 78.7 घरांमध्ये आणि शहरी भागातील 97.1 टक्के शहरी भागातील घरांना शौचालयाची सुविधा आहे. ग्रामीण भागातील 77.4 टक्के लोकांना आणि शहरी भागातील 92.7 टक्के लोकांना साबणासह हात धुण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील 49.8 टक्के आणि शहरी भागातल 92 टक्के लोकांना स्वयंपाकासाठी एलपीजी, नॅचरल गॅस, गोबर गॅस, बायोगॅस, वीजेच्या शेगड्या अशा सुविधा उपलब्ध असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
RSS : संघाच्या कार्यात महिलांचा सहभाग वाढवणार – मनमोहन वैद्य
15 ते 24 वर्ष वयोगटातील ग्रामीण भागातील 30.2 टक्के लोकांना आणि शहरी भागातील 27 टक्के तरूणांनी शिक्षण किंवा रोजगाराची संधी घेतलेली नाही. ग्रामीण भागातील 67.8 टक्के लोक आणि शहरी भागातील 83.7 टक्के लोक मोबाईल फोन वापरतात. तसेच ग्रामीण भागातील 18 पेक्षा अधिक वयाच्या 89.3 टक्के तरूणांचे आणि शहरी भागातील 89.6 टक्के भागातील 18 पेक्षा अधिक वयाच्या लोकांची बॅंकांमध्ये खाती आहेत. 31 मार्च 2014 नंतर ग्रामीण भागातील 11.2 टक्के लोकांनी आणि शहरी भागातील 7.2 टक्के लोकांनी स्वताचे पक्के घर घेतले आहे.