समलखा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक जागृती कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याबाबत संघाच्या येथे सुरू झालेल्या प्रतिनिधी सभेत चर्चा केली जाईल, असे संघाचे संयुक्त सरचिटणीस मनमोहन वैद्य यांनी रविवारी येथे सांगितले. येथे सुरू झालेल्या प्रतिनिधी सभेत गेल्या वर्षभरात संघ आणि त्याच्या सहयोगी संघटनांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला जाईल आणि पुढील एक वर्षाची कार्यपद्धतीही ठरवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भरतेवर भर देत भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक ठरावही संमत करणार आहे, असेही वैद्य म्हणाले.
संघाच्या कार्यात महिलांच्या सहभागावर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, महिलांसाठी संघाची राष्ट्रीय सेविका समिती ही एक समर्पित शाखा आहे. त्याद्वारे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले जाते. या बैठकीत समाजप्रबोधन, आणि संघाच्या सामाजिक परिवर्तनाच्या कामांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यावर यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले.
नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस
देशभरातील संघाच्या शाखांबाबतचा तपशीलही त्यांनी यावेळी सादर केला. पुढील वर्षापर्यंत दैनिक शाखांची संख्या एक लाखांपर्यंत वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे वैद्य म्हणाले. शाखांना उपस्थित राहणाऱ्यांपैकी सुमारे 60 टक्के विद्यार्थी आहेत तर बाकीचे व्यावसायिक, उद्योजक आणि कर्मचारी आहेत, असे ते म्हणाले.