करण जोहरच्या दोस्तानाच्या सिक्वलमधून कार्तिक आर्यनला डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे करण जोहर पुन्हा अडचणीत सापडला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या कथित आत्महत्येनंतर करणला सोशल मीडियात लक्ष्य करण्यात आले होते. तो आपल्या चित्रपटांत केवळ घराणेशाहीलाच प्राधान्य देतो अर्थात स्टार मंडळींच्या कुटुंबातील व्यक्तींनाच संधी देतो.
View this post on Instagram
बाहेरचे म्हणजे ज्यांचे चित्रपटसृष्टीत लागेबांधे नाहीत अशांना संधी देत नाही, जमलेच तर पाय ओढण्याचे काम करतो असा त्याचा सार होता. कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे या दाव्यांना पुष्टीच मिळाली आहे. त्यामुळे आता दोस्तानाच्या सिक्वलसाठी बाहेरच्या कलाकाराचा शोध सुरू आहे.
View this post on Instagram
राजकुमार राव, सिद्धांत चतुर्वेदी, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि अक्षय कुमार यांच्या नावाची आता चर्चा सुरू आहे. मात्र अक्षयलाच आपल्या चित्रपटात घेण्यासाठी करण विशेष प्रयत्नशील आहे. त्याचे कारण तो मोठा स्टार तर आहेच, मात्र त्याहीपेक्षा त्याच्या या चित्रपटात काम करण्याने चित्रपटाला एक वेगळीच उंची प्राप्त होईल शिवाय अक्षय बाहेरचा आहे. अन्य नावांतील वरुण धवन सोडला तर सगळे चित्रपटसृष्टीत नातलग नसलेले कलाकार आहेत.
View this post on Instagram
त्यामुळे यापैकी कोणालाही घेतले तरी चालणार आहे. मात्र अक्षयचे स्टारडम आणि त्याचे आउटसाइडर असणे या दोन्ही बाबी करणला खुणावत आहेत. आता अक्षय त्याला कसा प्रतिसाद देतो यावर पुढचे सगळे अवलंबून आहे. जान्हवी कपूर नायिका असून, दोन भाऊ-बहीण एकाच मुलाच्या प्रेमात पडतात अशी चित्रपटाची कथा आहे.