दुबई – आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत श्रीलंकेने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. रवी बिश्नोईच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी देण्यात आली आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे –
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, हार्दिक पांड्या, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चारिथ अस्लंका, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश टीक्षाना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.
दरम्यान, भारतासाठी हा ‘करो या मरो’ सामना आहे. टीम इंडियाला सुपर-4 फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्ताकडून हार पत्करावी लागली आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना हरल्यास भारतीय संघ आशिया कपमधून बाहेर पडेल.
त्याचवेळी श्रीलंकेने सुपर-4 फेरीतील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध जिंकला. हा सामना जिंकल्यास संघाचा अंतिम फेरीतील मार्ग सुकर होईल. ते हरले तर श्रीलंकेला आणखी एक संधी मिळेल. श्रीलंकेला पाकिस्तानविरुद्धचा सामना अजून खेळायचा आहे.