IND vs ENG : भारताने पाच कसोटी सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडची टीम दुसऱ्या डावात 194 धावा करून गडगडली. इंग्लंडकडून जो रूटने सर्वाधिक 84 धावा केल्या. अश्विनने पाच विकेट घेतल्या. कुलदीप आणि बुमराहने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.
तिसऱ्या दिवशी भारताने 473/8 धावसंख्येवरून खेळण्यास सुरुवात केली. यामध्ये भारताने केवळ चार धावा जोडल्या आणि भारताचा डाव संपुष्टात आला. शोएब बशीरने 5 तर जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टलीने 2-2 विकेट घेतल्या. भारताने 259 धावांची आघाडी घेतली होती. | IND vs ENG
याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. 103 धावांवर त्याचे आघाडीचे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. जॅक क्रॉली (0), बेन डकेट (2), ऑली पोप (19), जॉनी बेअरस्टो (39) आणि कर्णधार बेन स्टोक्स (2) लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, जो रूटने एक बाजू लावून धरत चांगला खेळ केला. | IND vs ENG
अश्विनने पाच विकेट घेतल्या
जो रूटने सावध खेळ करत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र तरीही दुसऱ्या बाजूने विकेट पडण्याची प्रक्रिया सुरूच होती. बेन फॉक्स (8), टॉम हार्टले (20), मार्क वूड (0), बशीर (13) स्वस्तात बाद झाले. भारताकडून आर अश्विनने 5, तर कुलदीप आणि बुमराहने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. | IND vs ENG
भारताने सलग चार कसोटी सामने जिंकले
कसोटी मालिकेबद्दल बोलायचे झाले तर पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये खेळला गेला. येथे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या कसोटीत भारताने पुनरागमन करत विजय मिळवला. राजकोट कसोटी सामन्यात विजयी मोहीम सुरू ठेवली. रांचीमध्ये इंग्लंडला हरवून मालिकाही जिंकली होती. अखेरच्या सामन्यात इंग्लडला पराभूत करून भारताने शेवटही गोड केला.