दुबई – जगातील सर्वोत्तम संघ भारत व मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणारा सर्वात यशस्वी संघ श्रीलंका यांच्यात थोड्याच वेळात आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाच्या लढतीस सुरूवात होणार आहे. साखळी फेरीत अपयशी कामगिरी केल्यानंतरही फिनिस्कप्रामणे भरारी घेतलेल्या श्रीलंका संघाचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर राहणार आहे.
ASIA CUP 2022. Sri Lanka won the toss and elected to field. https://t.co/TUBwEe7urA #INDvSL #AsiaCup2022
— BCCI (@BCCI) September 6, 2022
तत्पूर्वी, नाणेफेकीचा (टाॅस) झालेला कौल श्रीलंकेच्या बाजूनं लागला आहे. (Sri Lanka have won the toss and elect to bowl first) श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका याने टाॅस जिंकून गोलंदाजी स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
भारताचा टी-20 संघ बलाढ्य दिसत असला तरीही सलामीची जोडी तसेच मधली पळी सातत्याने सरस कामगिरी करताना दिसलेली नाही. कर्णधार रोहित शर्मा तर सातत्याने अपयशी ठरत आहे. लोकेश राहुलचेही संघातील स्थान निश्चित नाही. अशा स्थितीत नुकताच अर्धशतकी खेळी करुन भरात आला असे वाटत असलेला विराट कोहली, सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या या तिनच खेळाडूंच्या कामगिरीवर संघाचे यशापयश अवलंबून राहणार आहे.
दुसरीकडे श्रीलंका संघ अपयशाच्या गर्तेतून बाहेर आला असून त्यांनी साखळी फेरीतील सलामीच्या लढतीत अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारला होता. मात्र, या पराभवानंतर त्यांचा खेळ उंचावला व त्यांनी जिद्दीने बांगलादेशला पराभूत करत सुपर फोर गटात स्थान मिळवले. तसेच साखळीतील पराभवाचा वचपा काढताना त्यांनी अफगाणिस्तानचाही पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळेल याची दावेदारी सिद्ध केली.