Prakash Ambedkar on Nitin Gadkari| केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अनेकदा भाजपकडून डावलेले जात असल्याची चर्चा होताना दिसते. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी भाजपाच्या पक्षांतर्गत सत्तासंघर्षाबाबत मोठे विधान केले आहे. भाजपमधील काही लोकांना नितीन गडकरींची अडचण होत असल्याने त्यांना बाजूला करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, गडकरी बाजूला होण्यास तयार नसल्याने, त्यांना अडकवण्याचा कट भाजपाचे काही लोकं रचत असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
रविवारी रात्री अकोल्यात मुस्लिम समाजाच्या एका बैठकीत बोलत असताना प्रकाश आंबेडकरांनी हा गौप्यस्फोट केला. इतकेच काय तर नागपुरातील काही अधिकाऱ्यांना पकडून त्यांच्याकडून गडकरींनी लाच मागितल्याचे वदवून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. याच बैठकीत त्यांनी मुस्लिम समाजालाही खडे बोल सुनावले. Prakash Ambedkar on Nitin Gadkari|
अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी सभेत मुस्लिम समाजाशी संवाद साधताना म्हंटले की, “यंदा मुस्लिम म्हणूनच तुम्हाला वोटिंग करावी लागणार आहे. गडचिरोली आणि भंडारा वगळता प्रत्येक लोकसभेमध्ये दीड लाख मुस्लिम असून त्यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे या निवडणुकीत मुस्लिमांनी मुस्लिम म्हणूनच मतदान केलं तर त्यांना निवडणुका जिंकता येतील, देशात दलित आणि आदिवासींची जेवढी ताकद आहे, तेवढीच मुस्लिमांची आहे. मात्र, मुस्लिम आपली ताकद ओळखत नाही हेच त्यांचे दुर्दैव आहे. तुम्ही जागे झाले नाही, तर पुन्हा गोध्रा, अखलाख आणि पॅलेस्टाईनसारखी परिस्थिती येईल,” असा इशारा आंबेडकरांनी दिला.
वायकरांनी पक्षाशी एकनिष्ठ राहायचा खूप प्रयत्न केला Prakash Ambedkar on Nitin Gadkari|
काही दिवसातच निवडणुकीचे दिवस सुरू होतील. ही साधी निवडणुक नाही. संविधान बदलाचं आणि मुस्लिमांना लक्ष्य करण्याची सुरूवात आता होईल. रवींद्र वायकर यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहायचा खूप प्रयत्न केला. मात्र, जेव्हा पलीकडून फास आवळला गेला तेव्हा त्यांना पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर राहिला नाही. त्यामुळे ते शिंदे गटात गेल्याचे आंबेडकर म्हणाले.
14 तारखेपर्यंत त्यांची भांडण सुटली तरच…
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या आपसातील जागा वाटपाच्या शक्यतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मला वाटतं महाविकास आघाडी होण्यात मोठ्या अडचणी आहेत. पंधरा जागांवर तीनही पक्षांची भांडणं आहेत. 14 तारखेपर्यंत त्यांची भांडण सुटली तरच आमच्याशी वाटाघाटी होऊ शकेल. तसेच आम्ही दिल्या तेवढ्या जागा लढू. आपण हारलो किंवा जिंकलो तरी आपणच सिकंदर ठरणार आहे,” असेही आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा:
“बारामती कुणाचा सातबारा नाही” ; पवारांविरुद्ध शिवतारेंची निवडणूक मैदानात उडी