सातारा – भाजप पक्षाकडून मलाही ऑफर होती, पण काॅग्रेसची विचारधारा सोडून इतर पक्षात जाणं हे बुद्धीला न पटनारं होतं. जादीवादी पक्षाशी हात मिळवणी करणं, हे आमच्या विचारात बसत नाही. भाजपा सरकार आज देशात द्वेष माजवत आहे, हे थांबलं पाहिजे. सरकारला वेळीच धडा शिकवणं गरजेचं आहे, असं विलासराव पाटील-उंडाळकर म्हणाले. ते कऱ्हाड येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
पुढे बोलताना उंडाळकर म्हणाले, माझ्या 50 वर्षाच्या आयुष्यातील पहिली मीटिंग आज हाॅलमध्ये होते आहे. तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. हीच आमच्या कामाची पोहोच आहे.
2003 साली सोनिया गांधी कऱ्हाडमध्ये आल्या होत्या. त्यावेळी स्टेडियमवर झालेल्या सभेला दीड ते दोन लाख लोक उपस्थित होते. तेव्हा आम्ही 2004 ची निवडणूक जिंकली होती. सध्या देश द्वेषात गुरफटलेला आहे. हे थांबवलं पाहिजे, असे विलासराव पाटील- उंडाळकर म्हणाले.